Wednesday, 11 May 2022

|| समशेरजंग ||

 
आम्हाला शाप स्वकियांचा, अरे आता पर्यंत आम्ही परकीय आक्रमणे थोपवून लावली पण आमच्या  रक्तामासाच्या माणसांची आक्रमणे परतवून लावताना आमची माती रडली आमची धरती रडली, रक्ताचे थेंब मातीत मुरताना घुसमटून रडले।। 

    स्वराज्याची शपथ घेतल्या नंतर महाराजांच्या पुढे सगळ्यात मोठी आवाहने होती ती जवळच्या स्वकियांची म्हणजे जावळीचे मोरे, मावळचे बांदल, जे आदिलशाहीची मोठी सरदार घराणी ।। 

    कालांतराने बांदल स्वराज्यात आले आणि त्यांनी स्वराज्य साठी आपले रक्त अर्पण केले पण जावळीच्या जंगलातील काळा साप मात्र आपल्या कुरगोड्या करायचा थांबत न्हवता त्याचा बंदोबस्त करण हे खूप महत्त्वाचं झालं होतं ।। महाराजांनी खूप सामोपचाराने घेऊन सुद्धा चंद्रराव मोरे काय गप बसत न्हवता शेवटी राज्यांनी त्याचा बंदोबस्त करायचा ठरवलं आणि जवळीवर स्वारी केली मात्र ह्या जंगलाच्या सापाचा खात्मा करत असताना राज्यांना ह्या सापाच्या गळ्यातला एक हिरा मिळाला ।। 

    महाराजांनी स्वारी केल्या नंतर जावळीच्या जंगलात एकच तलवार अविरात्र चालली होती आणि ती तलवार qहोती त्या हिऱ्याची म्हणजे मुरार बाजी ह्यांची।। 

    त्यांची ती युद्ध कौशलता बघून महाराज धन्य झाले ।। 

    बांदल ह्यांच्या कडून लढलेले बाजी प्रभू देशपांडे, मोरे ह्यांच्या कडून लढलेले मुरार बाजी हे दोघेही सरदारकीची स्वामी निष्ठा पायाशी बांधून ते लढत होते आदीलशाही कडून।। 

    जावळीचा पाडाव करून महाराजांनी मुरारबाजी ह्यांना स्वराज्यात सामील करून घेतले आणि सासवड च्या पुरंदरचे किल्लेदार बनवले।।

    मुरारबाजी तसे मूळचे महाड तालुक्यातले किंजळोली गावचे।।

    शिव कार्यासाठी उरलेले आयुष्य समर्पित करायचे हेच उद्धिष्ट समोर ठेवून त्यांनी पुरंदरची जबाबदारी स्वीकारली ।। शिवरायांचे दक्खन मधले वाढते वर्चस्व औरंजेबाला पचत न्हवते, ह्या वेळी मात्र त्याने आपले सर्वात विश्वासू सरदार नावाने राजपूत पण मनाने मुघल असलेले मिर्झा जयसिंग ह्यास पाठवले आणि त्याच्या बरोबर भरपूर सैन्य दिल।। जयसिंग ह्यांच्या बरोबर आणखी एक क्रूर सरदार होता त्याच नाव दिलेरखान अतिशय क्रूर आणि युद्ध निपुण असा हा पठाण ।। 

    दक्खन मध्ये येताच त्याने लक्ष केला तो भिमासारखा अभेद असलेला पुरंदर किल्ला ।। पण त्याला ठाऊक कुठं व्हत किल्लावर कर्णसारखा तेजस्वी हिरा किल्ल्याची हिफाजत करायला बसला होता तो ।।। 

    पठाणाने सुरुवात केली ती गडाला वेडा देऊन पण त्याच्या हे लक्षात आलं की गड हा खूप पोलादी आहे एवढं शक्य नाही तो लगेच काबीज करण ।। 

    पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणे अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीने ओळखले नसेल तरच नवल. वज्रगड हा पुरंदरचा शेजारी पण पुरंदरची ताकत,  दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात त्यावेळी वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली. १५ दिवस जिवाच्या आकांताने किल्ला झुंजवला, पण दिलेरखानांच्या तोफांच्या मार्‍यापुढे गडाचा वायव्य बुरूज ढासळला आणि गड दिलेरखानाच्या ताब्यात गेला.  मुघलांच्या लांबपल्ल्याच्या तोफांपुढे पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला. आता वेळ पुरंदरची!

    वज्रगड पडणे म्हणजे पुरंदरच्या भक्कमतेला लागलेला टिकाव, पण मुरारबाजी हार मानतील तर सरदार कसले ।।

    दिवस उजाडला 16 मे 1665, पुरंदरच्या इतिहासाची साक्ष देणारा दिवस ।। दिलेरखान आपल्या सैन्यासह पुढची रणनीती आखत असताना त्याच्या मनात किंचितही विचार आला नसावा की सातशे मावळे गडावरून येतील आणि पाच हजार पठाणांमध्ये घुसून कापायला सुरुवात करतील आणि हीच रणनीती आखली होती मुरार बाजींनी ।। अस केलं नायतर पुरंदर कधीही मुघलांच्या हातात जाईल हे मुरारबाजी जाणून होते म्हणून त्यांनी स्वतःहून गडा बाहेर पडून दिलेरखानाला सामोरे जायचे ठरवले आणि अखेर ती वेळ आली ।। सातशे मावळे घेऊन हर हर महादेव च्या घोषणा देत मुरारबाजी घुसले ते सरळ दिलेरखानाच्या मोगली कळपात आणि एकच रणकल्लोळ मजला, स्वामिनिष्ठ तलवार काशी चालते हे पहिल्यांदा दिलेरखानाने बघितले असावे कदाचित त्याच्या नेत्रांचे पारणे फिटले असावे।। 

    तो मुरार तांडव बघून दिलेरखान अचंबित झाला, खुश झाला स्वतःचे पठाण कापले जात असून सुद्धा त्याने स्वतःहून मुघली उंदरांना मुरार बाजीं पासून माग घेतले आणि मोठ्या आवाजात बोलला;

    " है अल्लाह के भेजे हुये बंदे, कोण है तू, तू हमारी खिदमत मे आजा, अल्लाह के पनाह मे आ हंम तुम्हारी शान रखेंगे" 

    हे उद्गार ऐकून मुरार बाजी आणखीनच चिडले आणि रोषाने दिलेरखानं कडे जात बोलले "अरे तू काय आम्हाला फितुरी शिकवतो, तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय "

    आणि परत एकदा तुफान युद्ध पेटले, त्यांनी खानवर वार केला पण तो चुकला आता मुरारबाजी आपल्याकडं आलाय हे पाहून खानानं धनुष्य हाती घेतला आणि धनुष्याचा दोर कानापर्यंत खेचून मुरार बाजींच्या कंठाचा वेध घेतला आणि एक स्वराज्याचा शिरपेचातला आणखी एक तुरा खाली गळून पडला ।।। 

    बाजी खाली पडलेले पाहून खान कळवळला आणि बोलला; " ऐसा सिपाही खुदा ने पैदा किया " 

    "कसले हे धाडस, कसली ही स्वामी निष्ठा, अरे सातशे मावळ्यांमध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जाती आणि अनेक जाती धर्माची माणसे लढली त्यावेळी त्यांना विचारल असत ना की तुमची जात कुठली आणि धर्म कुठला तर कदाचित एकच उत्तर मिळालं असत, स्वराज्य आमचा धर्म आणि महाराज आमची जात"

    ।।।। स्वराज्य धर्मासाठी स्वतःचे रक्त अर्पण करणाऱ्या त्या प्रत्येक मावळ्याला माझा मनाचा आणि मानाचा त्रिवार मुजरा ।।।।

                                    ।।। हर हर महादेव ।।।



Tuesday, 10 May 2022

|| स्वराज्याची पहिली आहुती वीर बाजी पासलकर ||

छत्रपतींनी स्थापित केलेल्या रयतेच्या राज्याचे पहिले सेनापती.
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे एक असामान्य उदाहरण अख्या जगासमोर ठेवले.. त्यांचे हे कार्य अतुलनिय आहे. 
छ्त्रपति शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजीपासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते. शहाजी महाराजांचे विश्वासू असे हे बाजी छत्रपतींच्या पहिल्या रणधुमाळीचे साक्षीदार.. ह्या पराक्रमी पुरूषाचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे.
मोसे खोयातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र ‘यशवंतराव’ किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोऱ्यातील हे वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. गावा गावा तील तंटे सोडविण्यात हातखंडा असणारे, रोहिड खोऱ्यात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती.. 
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, शुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. त्याचा प्रतिकार करण्या साठी छत्रपतींनी बाजी, कान्होजी जेधे आणि कावजी मल्हार ह्यांना पाठविले. लढाईच शिंग वाजवत तलवारिंच्या फेरी झाल्या आणि हर हर महादेव च्या घोषणा देत एकच रणकल्लोळ उडाला, बाजी आणि प्रत्येक मावळ्याने आपल्या शौर्याची परिसीमा गाठली होती इतक्यात एक घाव बाजींच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा जमिनीवर कोसळला बाजी पडले ! आस होऊनही बाकी मावळयानी कत्तल ही सुरूच ठेवली कुठून येत असावी ही निष्ठा आणि प्रेम.. 
आपल्याला मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून जाऊ लागला हे कावजी मल्हारला समजताच तो तीरासारखा खानाच्या मागे धावला. आपले सरनोबत खाली पडलेले पाहून मावळ्यांनी त्यांचं अर्धमेलेले शरीर बाजींच्या यशवंती नावाच्या घोडीवर ठेवलं, आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती आणि फत्तेखानाच्या मागे आक्रोशाने पाळणारा कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात कदाचित एकच असावी ! तिकडे पुरंदर वर राज्यांच्या मनाला धाकधूक लागून राहून होती आणि इकडे यशवंतीला ...  बाजींनी मात्र शरीरात उरलेली प्राण वात फक्त आपल्या विजयी राजाला – शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,”बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट अश्रूंनी जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,”आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या रयतेच्या राज्याचे पहिले सेनापती.
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे एक असामान्य उदाहरण अख्या जगासमोर ठेवले.. त्यांचे हे कार्य अतुलनिय आहे. 
छ्त्रपति शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजीपासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते. शहाजी महाराजांचे विश्वासू असे हे बाजी छत्रपतींच्या पहिल्या रणधुमाळीचे साक्षीदार.. ह्या पराक्रमी पुरूषाचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे.
मोसे खोयातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र ‘यशवंतराव’ किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोऱ्यातील हे वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. गावा गावा तील तंटे सोडविण्यात हातखंडा असणारे, रोहिड खोऱ्यात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती.. 
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, शुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. त्याचा प्रतिकार करण्या साठी छत्रपतींनी बाजी, कान्होजी जेधे आणि कावजी मल्हार ह्यांना पाठविले. लढाईच शिंग वाजवत तलवारिंच्या फेरी झाल्या आणि हर हर महादेव च्या घोषणा देत एकच रणकल्लोळ उडाला, बाजी आणि प्रत्येक मावळ्याने आपल्या शौर्याची परिसीमा गाठली होती इतक्यात एक घाव बाजींच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा जमिनीवर कोसळला बाजी पडले ! आस होऊनही बाकी मावळयानी कत्तल ही सुरूच ठेवली कुठून येत असावी ही निष्ठा आणि प्रेम.. 
आपल्याला मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून जाऊ लागला हे कावजी मल्हारला समजताच तो तीरासारखा खानाच्या मागे धावला. आपले सरनोबत खाली पडलेले पाहून मावळ्यांनी त्यांचं अर्धमेलेले शरीर बाजींच्या यशवंती नावाच्या घोडीवर ठेवलं, आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती आणि फत्तेखानाच्या मागे आक्रोशाने पाळणारा कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात कदाचित एकच असावी ! तिकडे पुरंदर वर राज्यांच्या मनाला धाकधूक लागून राहून होती आणि इकडे यशवंतीला ...  बाजींनी मात्र शरीरात उरलेली प्राण वात फक्त आपल्या विजयी राजाला – शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,”बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट अश्रूंनी जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,” आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्‍या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !…..”
राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली आणि स्वराज्याची पहिली आहुती वीर बाजी पासलकर ह्या हुतात्म्याच्या नावाने पावन झाली ।। 
ज्या कान्होजी जेधेंसमोर हे सगळे घडलं त्यांना कुठेच काही कारण द्यायला जागा न्हवती की मी स्वराज्य साठी काही करायचं नाही आणि म्हणूनच बारा मावळ प्रांत कान्होजी जेधे ह्यांनी भविष्यात पावन केला आणि अवघ्या वतनावर पाणी सोडले।। 
प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूर वीर होते. स्वराज्यासाठी ते जगले. गेले. अजरामर झाले. त्यांचा पराक्राम कुठल्या जाती साठी धर्मा साठी न्हवता तो होता फक्त तेजस्वी फडकणार्या भागव्याच्या मानासाठी.. 
जगले मातीसाठी मेले मातीसाठी.… आता तरी उठा आणि जागे व्हा आपले पूर्वज चारशे वर्ष्या पूर्वी दिल्ली काबिज करायला निघाले होते आणि आपण बसलोय जातीच्या वारुळात मुंग्या बनून.. 
।।। जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ ।।।


||| स्वराज्य भक्ती- हिरोजी इंदलकर |||

जिजाऊंच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या, आई भवानीच्या आशीर्वादाने आणि सह्याद्रीच्या हिरव्या रांगोळीने नटलेल्या अश्या ह्या  माझ्या महाराष्ट्राल...